शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

आंबोलीत आणखी एक तपासणी नाका; सांगलीतील घटनेनंतर जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:32 IST

आंबोली : सांगली येथील अनिकेत कोथळेबरोबरच गडहिंग्लज येथील शिक्षकाचे खून प्रकरण उघडकीस आल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांनी दोन्ही घटनांची गंभीर दखल घेत आंबोली येथील दूरक्षेत्राबरोबरच कावळेसादकडे जाणाºया रस्त्यावर नवीन पोलीस तपासणी नाका उभारला आहे. या नाक्यावर दिवस-रात्र चार पोलीस कर्मचारी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आंबोली दूरक्षेत्राला अतिरिक्त पोलीस कर्मचारी ...

आंबोली : सांगली येथील अनिकेत कोथळेबरोबरच गडहिंग्लज येथील शिक्षकाचे खून प्रकरण उघडकीस आल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांनी दोन्ही घटनांची गंभीर दखल घेत आंबोली येथील दूरक्षेत्राबरोबरच कावळेसादकडे जाणाºया रस्त्यावर नवीन पोलीस तपासणी नाका उभारला आहे. या नाक्यावर दिवस-रात्र चार पोलीस कर्मचारी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आंबोली दूरक्षेत्राला अतिरिक्त पोलीस कर्मचारी देण्यात आले असून सीसीटीव्हीही सुरू करण्यात आला आहे.सांगली येथील पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे याचा मृतदेह आंबोलीतील महादेवगड पॉर्इंटवर आणून जाळण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच सांगलीतील घटनेच्या तिसºया दिवशीच आंबोलीतीलच कावळेसाद पॉर्इंटवर आणखी एक मृतदेह सापडला.हा मृतदेह गडहिंग्लज येथील शिक्षकाचा होता. या दोन्ही घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आंबोलीच्या पर्यटनाची बदनामी होत असल्याचे दिसून येत होते. राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली होती.मंत्री केसरकर यांनी आंबोली पोलीस दूरक्षेत्रावर अतिरिक्त पोलीस बळ वाढविण्यात येणार आहे. तसेच दूरक्षेत्राची जागा चुकीची असून दूरक्षेत्र अन्यत्र हलविण्याबाबत विचार सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. तर तात्पुरत्या स्वरुपात आणखी एक तपासणी नाका लावण्यात येणार आहे, असे जाहीर केले होते. त्यानुसार आंबोलीच्या दिशेने येणाºया कावळेसादकडे जाणाºया रस्त्यावर हा तपासणी नाका उभारण्यात आला आहे. या तपासणी नाक्यावर दिवसा चार, तर रात्रीच्यावेळी चार असे पोलीस ठेवण्यात आले आहेत. हा तपासणी नाका सोमवारी रात्रीपासून कार्यरत झाला आहे.तर आंबोली दूरक्षेत्रावर आणखी पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. तसेच दूरक्षेत्राचे बंद असलेले सीसीटीव्हीही सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे सांगलीच्या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असल्याचे यातून दिसून येत आहे.एखादी घटना घडल्यानंतर पोलीस दल जागे होते. त्याचा प्रत्यय आंबोलीला मंगळवारी आला. दीड वर्षापासून आंबोलीतील दूरक्षेत्राचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. याबाबत दूरक्षेत्राने पत्रव्यवहार करूनही त्याची दखल वरिष्ठ कार्यालयाने घेतली नव्हती. त्यामुळे हे सीसीटीव्ही बंद अवस्थेत होते. मात्र सांगलीच्या घटनेनंतर पोलीस दल जागे झाले आणि त्यांनी सीसीटीव्ही पुन्हा सुरू केले आहेत.